Socio-Political Outreach & Unity Movement
परंपरेची ओळख, एकतेची ताकद आणि प्रगतीचा मार्ग — संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेली बंजारा एकतेची ऐतिहासिक चळवळ.
बंजारा समाज हा भारतभर पसरलेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक समाज आहे. खानपान, वेशभूषा, परंपरा, सण-उत्सव, भाषा आणि धर्म यातील समानता असूनही आज समाज विविध नावांनी आणि वर्गांनी विभागला गेला आहे.
स्थलांतर, पशुपालन, व्यापार, स्वतंत्र व अद्वितीय सामाजिक-कौटुंबिक संरचना आणि स्वावलंबन यावर आधारित समृद्ध परंपरा.
खानपान, वेशभूषा, परंपरा, सण-उत्सव, भाषा आणि धर्म यातील अद्वितीय समानता — एकाच मुळाची शाखा.
राजकीय, सामाजिक सीमांमुळे विविध प्रांतात विविध आरक्षण वर्गिकरण व उपनामांमध्ये विभागणी → संघटित शक्तीचा अभाव.
या विभागणीमुळेच समाज अनेक दशकांपासून राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात मागे राहिला आहे. आता ही विभागणी थांबवण्याची वेळ आली आहे.
समाजात एकजुटीचा अभाव असल्याने हक्कांच्या लढाया कमकुवत ठरल्या. एकत्र न आल्याने संधी वारंवार गेल्या.
आजची गरज आहे — एकत्र येणे, एक आवाज निर्माण करणे. संघटित समाज हाच खरा बळकट समाज.
ह्याच उद्देशाने संजयभाऊ राठोड यांनी महाराष्ट्रासह देशभर संवाद दौरे सुरू केले आहेत.
देशभरातील बंजारा बांधवांना एका आरक्षण वर्गात एकत्र आणण्याच्या मागणीसाठी संजयभाऊ राठोड यांनी केलेले ऐतिहासिक संबोधन. या भाषणात समाजाच्या विभागणीचे मूळ कारण आणि उपाय यावर प्रकाश टाकला आहे.
YouTube वर पहादेशभरातील आरक्षण धोरणाचे एकसंधीकरण — भौगोलिक सीमा ओलांडून एकच आवाज.
संविधानिक हक्क आणि न्याय मिळविण्याचा संघर्ष — आता थांबणार नाही.
खान-पान, रहन-सहन, बोली भाषा व दैवत इ. बाबत ऊहापोह — मूळ एकच आहे.
समाजाची वज्रमूठ बांधू...बंजारा आहेत बंधू..!
समाजमेळावे, सामूहिक विवाह सोहळे, अधिकारी-कर्मचारी मेळावे — सर्वसमावेशक उपक्रम.
सेवालाल महाराज, रूपसिंग महाराज, लकीशाह बंजारा यांच्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम.
तांड्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशभरात सातत्याने संवाद व एकत्रिकरणाचे उपक्रम.
पोहरादेवी येथे समाजाचा भव्य महासमूह एकत्र आला. नंगारा म्युझियमचे भूमिपूजन आणि २१ मागण्यांचे निवेदन शासनासमोर ठेवण्यात आले.
संत सेवालाल महाराजांचा पंचधातूतील अश्वारूढ पुतळा अनावरण — मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व लाखो बांधवांच्या उपस्थितीत.
महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत — देशभरातील बंजारा बांधवांना एकत्र आणण्यासाठी ऐतिहासिक संवाद यात्रा सुरू.
बणजारा विरासत लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत, १२ राज्यांच्या प्रतिनिधींनी एकतेचे निवेदन दिले.
संजयभाऊ राठोड यांचे महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर देशभरातील सर्व राज्यांमध्ये संवाद दौरे सुरू आहेत. पुढे उर्वरित राज्यांमध्येही संवाद दौरे करण्याचा त्यांचा मानस आहे.
"भौगोलिक प्रांतानुसार समाजाचे नाव, प्रवर्ग वेगळे असले तरी एकच बोलीभाषा..चालीरीती एक..पेहराव एक..दैवत एक..खाद्य संस्कृती एक..बंजारा समाजास एक देश..एक आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे..!"
समाजातील सर्व गटांचे, सर्व राज्यांतील बांधवांचे एकत्रिकरण हे मुख्य ध्येय.
राजकीय क्षेत्रात मजबूत प्रतिनिधित्व — निर्णय प्रक्रियेत बंजारा आवाज.
आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि भावी पिढीपर्यंत पोहोच.
शिक्षण आणि आर्थिक विकासातून समाजाची खरी प्रगती साधणे.
संघटन हीच शक्ती आहे..समाजाचे भविष्य घडविण्याची ज्यात युक्ती आहे..!
आपल्या अधिकारांसाठी जागृत होण्याची, संघटित होण्याची वेळ आता आली आहे.
गट-तट विसरून एकसंघ बंजारा समाज म्हणून पुढे येण्याची संधी.
हक्कांची लढाई एकत्रितपणे लढण्याची — यशाचा मार्ग एकतेतूनच.
समाजाला एकत्र आणल्याशिवाय पर्याय नाही – हीच खरी वेळ आहे कृतीची.
बंजारा समाजाचे केवळ राज्यनेते नव्हे, तर देशपातळीवरील नेतृत्व म्हणून उदयास आलेले व्यक्तिमत्त्व.
त्यांची राजकीय कारकीर्द आणि सामाजिक कार्य बंजारा समाजासाठी खरोखरच ऐतिहासिक ठरत आहे.
त्यांनी अनेक बंजारा युवकांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात उतरवण्याचे कार्य हाती घेतले आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील बांधवांमध्ये सर्वसमावेशक व आश्वासक नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत अशी जनभावना आहे.
गट-तट, राजकीय मतभेद, किंतु-परंतु विसरून आपण सारे एकसंघ बंजारा समाज म्हणून पुढे येऊया..आपली ओळख व संस्कृती जपूया..आपले हक्क मिळवूया आणि राष्ट्रीय पातळीवर एक मजबूत ओळख निर्माण करूया..!
बंजारा समुदायाच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आमच्यासोबत या. देशभरातील संवाद-दौऱ्यांची माहिती मिळवा.