परिचय
'बणजारा विरासत संघ' संस्थेचा आणि मुख्य संयोजक ना. श्री. संजय राठोड यांचा
बणजारा विरासत संघ
प्रस्तावना
"बणजारा विरासत संघ" ही संस्था बंजारा समाजाच्या सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, व्यावसायिक, क्रीडा व कौशल्य उन्नतीसाठी संपूर्ण देशात कार्यरत आहे.
ही संस्था बंजारा समाजाचे सुपुत्र,संजय राठोड (मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या संकल्पनेतून साकारली असून, देश पातळीवर सशक्त आणि प्रभावी चळवळ घडवणे हेच या संघटनेचे ध्येय आहे.
संस्थेची संकल्पना
बंजारा बांधव देशभरात
व्यासपीठ निर्मिती
चळवळ घडवणे
उद्दिष्टे
सामाजिक एकात्मता
- सर्व बंजारा संघटनांचा समन्वय
- ठाम व एकसंघ मतप्रवाह निर्माण करणे
शैक्षणिक प्रगती
- स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण
- शिष्यवृत्ती व मार्गदर्शन
- डिजिटल शिक्षण व प्रशिक्षण
आर्थिक सक्षमीकरण
- SHG, MSME प्रशिक्षण
- FPO/FPC स्थापन
- हस्तकला प्रोत्साहन
महिला सक्षमीकरण
- महिला उद्योजकता
- आरोग्य जागरूकता
- नेतृत्व विकास
तरुणांसाठी संधी
- कौशल्य विकास प्रशिक्षण
- कला व क्रीडा उपक्रम
- IT/Digital प्रशिक्षण
- रोजगारासाठी मार्गदर्शन
तांडा विकास
- पाणी, वीज, रस्ते
- शाळा व आरोग्य सुविधा
- पायाभूत विकास
राष्ट्रीय परिषद
दरवर्षी १०–१५ फेब्रुवारी भव्य अधिवेशन
राष्ट्रीय कार्यालय
मुंबई येथे मुख्य कार्यालय(प्रस्तावित)
प्रादेशिक नेटवर्क
विभाग/जिल्हा/तालुका स्तरावर कार्यालये
डिजिटल कनेक्टीव्हिटी
वेबसाइट, अॅप, सोशल मीडिया
आवाहन
ही फक्त संस्था नाही—आपल्या समाजाच्या नव्या भविष्याचा पाया आहे. चला, आपण सर्वजण " बणजारा विरासत संघ" या ऐतिहासिक चळवळीत सहभागी होऊया!
आमच्यासोबत सामील व्हाना. श्री. संजय राठोड
मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य
मुख्य संयोजक -संजय राठोड यांच्या विषयी..
संजय दुलीचंद राठोड हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते आहेत, जे सुरुवातीपासूनच शिवसेनेत आहे. ३० जून १९७१ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पहूर इझारा येथे जन्मलेले श्री.संजय राठोड यांनी सार्वजनिक सेवा आणि ग्रामीण विकास हेच आपले करियर मानले आहे.
त्यांनी यवतमाळ येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉम. (१९९३) आणि हिंगणघाट येथील सुभेदार रामजी आंबेडकर शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून बी.पी.एड. (१९९५) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.संजय राठोड यांनी वयाच्या २१ व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि १९९५-९६ मध्ये शिवसेनेत सामील झाले. ते दिग्रस येथून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत (२००९, २०१४, २०१९, २०२४) आणि सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये मृद आणि जलसंधारण मंत्री आहेत.
मंत्री पदाची शपथ
महसूल(राज्यमंत्री) पदाची शपथ
महाराष्ट्र राज्य - महसूल(राज्यमंत्री) जबाबदारी
वनमंत्री पदाची शपथ
महाराष्ट्र राज्य - वन मंत्रालयाची जबाबदारी
अन्न व औषध प्रशासन मंत्री
महाराष्ट्र राज्य - अन्न व औषध प्रशासन मंत्रालय
मृद व जलसंधारण मंत्री
महाराष्ट्र राज्य - मृद व जलसंधारण मंत्रालय
Key Achievements
Vision & Mission
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुढच्या पिढीला चांगले भविष्य देण्यासाठी निरंतर कार्यरत राहणे हेच आमचे ध्येय आहे.
संपर्क साधा